त्या दिवशी मुली खूश होत्या
मी त्यांना आज जास्त वेळ खेळायची मुभा दिली होती........
निरागस त्याच्या चेहरा
आणि त्यावर हास्याची कारंजी फुलली होती.......
अताशा अंधार पडू लागला होता
रात्र होत होती...
यजमान बाहेरगावी असल्याने
घरी जायची लगबग नव्हती...
विचार केला जाऊ बाहेरूनच खाउन....
पण ! पण ! अंधाराचं काय?
असेल का कोणी रस्त्यावर?
होईल का कोणाची संगत?
कपाळावर होत्या आठ्या
आणि हृदयात धडधड होती......
पोरींची चेष्टा मस्करी होती...
सेल्फी आणि पाउट ची स्टाईल होती....
निरागस त्यांचा चेहरा आणि
हास्याची कारंजी होती....
तेव्हड्यात एकाएकी लोकांचा
जमाव पाहिला.....
एकच त्यांच्यात गलका पाहिला...
बलाक्ताराला शासन झालेच पाहिजे....
ह्याचाच त्यांचा नारा होता...
थोडेसे घाबरलो आम्ही..
थोडेसे भांबावलो आम्ही..
तेवढ्यात...
माझ्या छोटूलीचा प्रश्न आला..
आई! बलात्कार म्हणजे काय गं?
मला पण तो मिळेल काय गं?
क्षणभर मी लक्षंच नाही दिले..
तसे तीने पुन्हा पुन्हा विचारले...
काय सांगू तीला.
कसं समजाऊ तीला?
मोठी मुलगी आली मदतीला..
आणि गप्प केले छोटूलीला..
पाहिले मात्र तीच्याकडे...
निरागस तीचा चेहरा होता...
लहानीच ती..
लागली हट्ठ करायला...
तीला पण हा बलात्काराचा
खेळ खेळायचा होता....
काय कळतय तीला ह्यात?
काय समजतय तीला ह्यात?
अश्याच एका कोवळ्या जीवाला
चिरडलं होतं त्याने..
नासवलं होतं त्याने.....
किती अजाण किंकाळ्या असतील उठल्या...
किती पाशवी त्रासांचा व्रण असेल उठला...
मुलीचा प्रश्न तर टाळला होता आज मी..
पण असे प्रसंग काय टाळू शकत होते मी?
मनात असंख्य विचारांची माला होती...
बलात्कार ह्या शब्दाचा अर्थ मी समजाऊ शकेन काय..
तीन मुली पदरात आहेत..
त्यांचे पंख तर छाटले जाणार नाहीत ना?
काहूर काहूर काहूर..
नुसतं काहूर माजलयं.
माझ्या तीच्या..
प्रत्येक आईच्या...
...बलात्कार म्हणजे काय
मुलींना सांग्यासाठी नसलेल उत्तर
©सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
No comments:
Post a Comment